Sunday, January 23, 2011

२६ जानेवारी वा १५ ऑगष्ट ला आपण काय करता ???

आपण स्वतंत्र भारताचे नागरीक, आपण २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि १५ ऑगष्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

आपण त्या दिवशी काय करतो, कारण ते आपले राष्ट्रीय सण आहेत. आपण शाळेत असताना या दोन्ही दिवशी फार उत्साहात असायचो, एक दिवस आधी आपण त्याची तयारी करायचो, शाळेच्या गणवेश तयार करणे, बुटपॉलीश करणे वगैरे तयारी करायचो आणि त्यादिवशी उत्साहाने सकाळीच शाळेत जायचो, झेंडावंदनाला आभिमानाने उपस्थीत रहायचो, प्रभातफेरीमध्ये सहभागी होवुन "एक रुपया चांदीचा, भारत देश गांधीचा", "एक दोन तिन चार, भारतमातेचा जयजयकार" अशा घोषना द्यायचो, त्या दिवशी देशपेमात न्हाहुन निघायचो, पण आत्ता मोठ्ठे झाल्यावर आपण त्या दिवशी नेमके काय करतो ?

नोकरदार वर्ग त्यांच्या कार्यालयात झेंडावंदनाला जातात पण इतर नागरीक झेंडावंदनाला जातात का ? ग्रामपंचायत, नगरपालीका, महानगरपालीका, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सार्वजनीक झेंडावंदन होते तेथे आपण उपस्थीत राहतो का ? शाळा, महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर किती जण न चुकता झेंडावंदनाला उपस्थीत असतात ?

आपण त्या दिवशी हे मात्र करु शकतो, झेंडावंदनाला उपस्थीत राहु शकतो, प्लास्टीकचे झेंडे वापरला बंदी असताना देखील ते झेंडे सर्रास विकायला येतात, लहान मुले ते विकत घेतात, परंतु काही वेळा ते रस्त्यावर टाकुन देतात, असे रस्त्यावर पडलेले झेंडे आपण गोळा करु शकतो, त्यामुळे झेंडे पायदळी तुडवले जाणार नाहीत ,झेंड्यांचा होणारा अपमान तरी टळेल.

वर्षभर नाही तरी १५ ऑगष्ट, २६ जानेवारी, १ मे यादिवशी आपल्या देशभक्तीला उधान आलेले असते, यावेळी किमान एवढे जरी केले तरी आपल्याला समाधान लाभेल असे वाटते .

Friday, January 14, 2011

पानिपत च्या शौर्यगाथेला २५० वर्षे पुर्ण झाली....

(पानिपत रणसंग्रामातील विर योध्द्यांना मानाचा मुजरा...........)

इ.स.१७६१ साली झालेल्या पानिपतच्या युध्दाला १४ जानेवारी २०११ रोजी २५० वर्षे पुर्ण होत आहेत. पानिपतचे युध्द हे मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्चाचे पान आहे. पानिपतच्या युध्दात पराभव जरी पत्कारावा असला तरी ती मराठ्यांच्या इतिहासातील एक शौर्यगाथा होती. ती लढाई जिंकली असती तर
त्यावेळी मराठी सत्ता महासत्ता म्हणुन उदयास आली असती.

पानिपत लढाईमध्ये सहभागी हजारो मराठी सरदारांना आपले प्राण गमवावे लागले. पराभव परंतु प्रेरक अशी ही जगाच्या इतिहासातील दुर्मीळ घटना आहे.

पानिपतच्या युध्दात हार पत्करुन सुध्दा मराठ्यांनी अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातुन धडा घेवुन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक्रमक त्यानंतर भारतावर हल्ला करु शकला नाही हा त्या लढाईतील पराक्रमाचा इतिहास आहे.

१४ जानेवारी २०११ रोजी पानिपत रणसंग्रामास २५० वर्षे पुर्ण झाली पानिपतच्या रणांगणात धारातिर्थी पडलेल्या विरांचे रक्त आणि २६/११ च्या पाकीस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिका-यांचे रक्त हे शुर विरांनी आपल्या देशाला सुरक्षीत ठेवण्यासाठी सांडलेले रक्त होते. त्यांनी देशरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, आज आपण त्यांच्या या बलीदानाची जाणीव ठेवुन आपण आपल्या देशासाठी काय करु शकतो याचा विचार करुन तो विचार आमलात आणला पाहीजे तर त्या सर्व विरांना खरी श्रध्दांजली ठरेल........

पानिपत लढाईमध्ये शहीद झालेल्या हजारो विरांना मानाचा मुजरा......