Thursday, December 30, 2010

लाखाचा असो वा कोटीचा, तुमचे आमचे सेम असतं..........

आदर्श म्हणॆ लवासाला
तु किती लाखाचा
तर टु-जी म्हणे सी.डब्ल्यु.जी ला
तु किती कोटीचा
एक घोटाळा म्हणे दुस-याला
काडीने खाल्ले काय अन
हाताने खाल्ले काय
शेण म्हणजे शेण असते
लाखाचा असो वा कोटीचा
तुमचे आमचे सेम असते


अनंत घोटाळ्यांनी गाजलेल्या सरत्या वर्षाला निरोप देताना खरव आनंद होतो आहे, २०१० हे वर्षच मुळी महाघोटाळ्यांचे वर्ष म्हणुन गणले जाते की काय इतके मोठे घोटाळे या सरत्या वर्षात झाले. कॉमनवेल्थ घोटाळा काय अव टु-जी स्पेक्ट्र्म घोटाळा काय यांनी मागील सर्व घोटाळ्यांचे विक्रम मोडीस काढले, भारताचा अर्थव्यवस्था खिळखीळी होती की काय अशी परीस्थीती या घोटाळ्यांनी निर्माण केली. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घरी जावे लागले, दोन केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई झाली, एखाद्या क्रिकेट्पटुने खेळताना नवनवे उच्चांक प्रस्थापीत करावेत तसे नेत्यांनी नवनवीन घोटाळ्यांचे उच्चांक प्रस्थापीत केले.

सरत्या वर्षात महागाईने उच्चांक गाठला, पेट्रोलच्या भावात तब्बल सहा वेळा वाढ झाली, सामान्य माणसाचा जीव या महागाईत होरपळुन निघाला, कांद्याने सामान्य माणसाबरोबर सरकारच्या ही डोळ्यात पाणी आणले, सततच्या पावसाने शेतीमालावर खुप परिणाम झाला,

काही चांगले झाले असेलही परंतु २०१० ने जनतेला महागाई, भ्रष्टाचार आणि त्रास हेच जास्त प्रमाणात दिले.

Thursday, December 23, 2010

साहित्य संमेलन का उधळवता ?

तब्बल २२ वर्षांनी ठाण्यामध्ये अखिल भारतीय साहीत्य संमेलन होत आहे, ठाणेकरांसाठी ही गौरवाची गोष्ट आहे. ठाणेकरांनीही त्याची जोरदार तयारी केली आहे, संमेलनाच्या संयोजकांनी साहीत्य संमेलनातील मंचाना, प्रवेशव्दारांना  थोर साहीत्यीकांची नांवे दिलेली आहे, त्यात सावरकरांपासुन ते शाहीर विठ्ठ्ल उमाप यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे, असे हे सर्वसमावेशक संमेलन काही विषीष्ट जातीयवादी संघटनानी केवळ क्रिडा संकुलाच्या नावावरुन संमेलन उधळवुन लावु अशी धमकी दिली आहे. संमेलनाचा आणि क्रिडा संकुलाच्या नावाचा काहीही संबंध नाही परंतु ही धमकी केवळ सवंग प्रसीध्दी मिळवण्यासाठी दिली गेली की काय अशी शंका येते.

साहीत्य संमेलनात विचारांचे मंथन होते, तेथे विचारांचा सामना विचारांनी केला पाहीजे, विचारांचा सामना झुंडशाहीने करुन काय साध्य होणार आहे. हे संमेलन केवळ उच्चवर्णीयांचे आहे, त्याला आम्ही विरोध करणारच हे हास्यास्पद वाटते, आधुनिक महाराष्ट्रात जातीने कोणी उच्चवर्णीय ठरत नाही, त्याची वैचारीक पातळी उच्च असायला हवी, सर्वच जातीमध्ये चांगल्या आणि उच्च विचारांचे साहीत्यिक आणि विचारवंत आहेत, त्यामुळे केवळ जातीय राजकारणातुन असे हास्यास्पद आरोप कोणीच करायला नकोत. जशी राजकारण ही केवळ कोणत्या विशीष्ट जातीची मक्तेदारी राहीलेली नाही तशीच साहीत्य ही सुध्दा कोणत्या विशीष्ट जातीची मक्तेदारी राहीलेली नाही, राजकारणामध्ये दर्जा महत्वाचा मानला जात नाही परंतु आजही साहीत्यामध्ये "दर्जेदार साहीत्य" हा प्रकार अस्तीत्वामध्ये आहेच. आणि दर्जेदार साहीत्य हे समाजाकडुन आजही स्विकारले जाते, त्यावेळी साहीत्यीकाची जात पाहीली जात नाही. साहीत्य संमेलन उधळवुन लावु  या झुंडशाहीचा सर्वस्तरातुनच निषेध होईल.    

Sunday, December 19, 2010

शतकांचे "अर्धशतक" करणारा जिगरबाज "सचिन"

गेली तब्बल २१ वर्षे भारतीय क्रिकेटमध्ये तळपणारा तेजस्वी तारा म्हणजे जिगरबाज "सचिन"...
शतकामागुन शतके आणि विक्रमामागुन विक्रम करणारा जिगरबाज "सचिन"
टिकाकारांनी कितीही टिका केल्या तरी विचलीत न होता त्यांना आपल्या बॅटनेच उत्तर देणारा जिगरबाज "सचिन"
मॅच फिक्सींग च्या वादळापासुन दुर असणारा जिगरबाज "सचिन"
२१ वर्षे अत्यंत संयमाने बॉलवरील नजर न ढळु देता बॅट आणि बॉलशी अद्वैत साधलेला जिगरबाज "सचिन"
मागील २१ वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये कितीही वादळे आली परंतु त्यातही धिरोदत्तपणे पाय रोवुन उभा राहीलेला  जिगरबाज "सचिन"
१९८९ साली वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पाकीस्तानच्या ईम्रान,अक्रम आणि वकार चा यशस्वीपणे सामना केला आणि आपल्या करकिर्दीची सुरुवात करुन आजतागायत वयाच्या ३७ पर्यंत सर्वांच्याच गळ्यातला ताईत बनलेला  जिगरबाज "सचिन"
आजही क्रिकेटवरील तिच निष्ठा,तिच जिगर,बॉलवरील तिच नजर, बॅटवरिल तिच पकड, अडचणीच्या काळातही पाय रोवुन उभे राहण्याची तिच जिगर, भारतीय क्रिकेटमधील मुकुटमणी, कोहीनुर हिरा म्हणजेच  जिगरबाज "सचिन"
आजही सामना चालु असताना "सचिन आहे का रे ?’ असे विचारत तो खेळत असला तर हातातली कितीही महत्वाची कामे सोडुन त्याचा खेळ बघणारा भारतीय प्रेक्षक आणि सचिन यांचे नाते काही औरच...


त्या क्रिकेटच्या ख-याखु-या नायकाला मानाचा मुजरा...........................  
 

Saturday, December 18, 2010

संगणकाच्या "उंदराचा" सांगाडा, अन मजेशीर चित्रे...




आपण सर्वजन रोजच संगणकाच्या सातत्याने संपर्कात असतो, माऊस तर आपला जीवलग, त्याची मजेशीर कार्टुन्स मला आंतरजालावर सापडली, आपल्याला आवडली तर बघा..

Sunday, December 12, 2010

मनोगत मेलेल्या "मी" चे...

मरणामुळे सरणावर गेलो
सरणाचे आम्हा नवल नव्ह्ते
जीवंतपणी रोजचेच तसे
सरणावर जळणे होते
जीवंत होतो मी परंतु
जगण्यासारखे काय होते
धावत होतो मी परंतु
मिळणार मज काय होते
मी असा मी तसा हे माझे ते माझॆ
रोज रोज हे माझॆ सांगणे होते
मेल्यानंतर मला उमगले
जगात आपले काहीच नव्ह्ते
जीवंतपणी माझॆ "मी" पण
मला रोज छ्ळत होते
मेल्यानंतर खरेतर माझा देह नव्हे
माझॆ मीपण जळत होते

Friday, December 10, 2010

माझा शुभेच्छा मित्र..........

माझा एक बालपणीचा मित्र, वर्गमित्र सध्या अक्कल्कोट जि.सोलापुर येथे प्रथम वर्ग न्यायाधीष म्हणुन कार्यरत आहे. त्याच्या  अनेक सदगुणांपैकी एक गुण म्हणजे त्याला शुभेच्छा पाठवण्याचा असलेला छंद, त्याच्या मित्र, नातेवाईक यांच्या बरोबर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस त्याच्या लक्षात असतात, एकवेळ ती व्यक्ती त्याचा स्वत:चा वाढदिवस, किंवा लग्नाचा वाढदिवस कामाच्या व्यापात विसरेल परंतु हा पठ्ठ्या विसरणार नाही, मी तर हमखास माझ्या बायकोचा वाढदिवस आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस  विसरतो आणि मोबाईलवर सकाळी सकाळीच आमच्या लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छांचा त्याचा मेसेज येवुन धडकला की मग मला धावपळ करावी लागते आणि वेळ मारुन न्यावी लागते. यावर्षी मी नविन घर बांधले ,वास्तुशांतीचा मुहुर्त ईतक्यात नसल्यामुळॆ गणेशपुजन करुन गृहप्रवेश करण्याचे ठरवुन आम्ही कार्यक्रमाची आखणी केली, वाढता वाढता गृहप्रवेश चा कार्यक्रम मोठा झाला, मी ब-याच माझ्या मित्रांना व नातेवाईकांना त्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले, आमच्या सौ च्या शाळेतील कर्मचारी, भावाचे मित्र, आईचे महीला मंडळ, वडीलांचे मित्र असे मिळुन ब-याच जनांना आमंत्रण दिले गेले ,बरेच जन विसरल्याचे कार्यक्रमाच्या दिवशी लक्षात आले परंतु ऐनवेळेस आमंत्रण देणे शक्य नसल्यामुळे आम्ही कळुनही त्यांना आमंत्रण देवु शकलो नाही. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी अक्कल्कोटहुन खास वेळ काढुन हे महाशय सपत्नीक कार्यक्रमाला वेळेवर हजर झाले, माझ्या डोळ्यात क्षणभर पाणी आले की आपण त्याला कसे काय विसरलो ? आणि न्यायाधीषासारख्या पदावर काम करताना वेळात वेळ काढुन तो मात्र कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणुन मनात कुठलेही किल्मीश न ठेवता कार्यक्रमाला वेळेवर हजर झाला, मला मेल्याहुन मेल्यासारखे झाले, शेवटी आपण आपल्या आनंदात आपल्या आप्तेष्टांना सामील करुन घेण्यासाटीच असे कार्यक्रम करत असतो आणि सर्वजण आले तरच आपला तो कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पडतो. आज समाजात वावरताना प्रत्येकालाच त्याच्या "इगोने" ग्रासलेले आहे, मला बोलावले नाही मी जाणार नाही अशी जवळची नातेवाईक मंडळी ही भुमीका घेतात आणि साध्या शुभेच्छा ही देत नाहीत, या "इगोवर" मात करणं कदाचीत मलाही अवघड गेलं असतं. त्या दिवशी इतके पाहुने येवुनही मला जेवढा आनंद झाला त्याही पेक्षा जास्त आनंद आणि समाधान त्याच्या येण्यामुळे झाला, त्यानंतर त्याची परत प्रत्यक्ष भेट झाली नाही पण ९ डिसेंबरला त्याचा           वाढदिवस होता , १ डिसेंबर पासुन मी घोकत होतो पण ऐन वेळेस विसरलो, एवढे रामायण होवुनही मी त्याचा वाढदिवस परत एकदा विसरलो, खरचं माझा हा करंटेपणा मलाही टोचायला लागला आणि हे सर्व आपणासमोर मांडावे आपला अनुभव आपल्या ब्लॉगर मित्रांना सांगावा म्हणुन हा खटाटोप केला, या जगात मोठ्या मनाची माणसं आहेत हे मात्र या निमीत्ताने मला कळलं एवढच काय ते फलीत............................

Tuesday, December 7, 2010

खरच आपल्याला मराठीची लाज वाटते ?

महाराष्ट्रात राहणा-या ९० टक्क्यापेक्षा जास्त मराठी बांधवांना मराठीची लाज वाटत नाही हे मी छातीठोकपणे सांगु शकतो, ईंग्रजीची ज्यांना खाज आहे त्यांना मात्र ईंग्रजी बोलण्यात मजा वाटत असावी. मोठमोठ्या पदावर असणारे काही मुळ मराठी असलेले लोकच इंग्रजाळलेले मराठी बोलताना मी बघीतले आहेत. मराठी बाणा जागवणारा आजपर्यंत कोणी भेटलाच नव्हता म्हणुन मराठी भाषेला ईंग्रजी सारखा दर्जा प्राप्त झाला नाही. आपण राहतो मराठी मुलखात आणि तेथे आमच्या दुकानावर पाट्या ईंग्रजी मध्ये हा विनोद म्हणावा का ईंग्रजी चे अंध अनुकरन , आम्ही आमच्या गावात आमच्या काही व्यापारे मित्रांना हे समजावुन सांगीतले की आपण मराठी आपले ग्राहक मराठी त्यांना ईंग्रजी कमी आणि मराठी अधीक समजते मग दुकानाच्या पाट्या ईंग्रजीत का लावता, त्यातल्या बहुतांश जनांनी आपल्या पाट्या सुंदर मराठीत करुन घेतल्या त्यांच्या दुकानात येणा-या ग्राहकांची संख्या वाढली. त्यांचेही समाधान झाले मलाही मराठी साठी काहीतरी केल्याचे समाधान मिळाले.

आपले नेतेही दिल्लीत गेल्यावर हिंदीतुन, ईंग्रजीतुन किंवा इंग्रजाळलेल्या मराठीतुन बोलताना दिसतात ते महाराष्ट्रात परत आल्यावर सुध्दा त्याचेच अनुकरण करतात, त्यांनी दिल्लीतच काय संसदेत सुध्दा मराठीत बोलले पाहीजे म्हणजे मराठी माणसांचा उत्साह आणखी वाढेल. 
   
मराठी स्पर्धा जागतीक दर्जा मिळालेल्या ईंग्रजी शी नाही ज्यांना मराठी समजतच नाही त्यांच्यापाशी कितीही डोके फोडले तरी काय उपयोग आहे त्यासाठी मराठी भाषेला जागतीक दर्जा प्राप्त होण्यासाठी मोठ्या प्रमाणवर प्रयत्न होणे आवश्यक आहे, आधी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांनी मराठीतुनच बोलायला पाहीजे , ब-याच शहरात मराठी माणुसच एकमेकांशी हिंदीतुन, ईंग्रजीतुन किंवा इंग्रजाळलेल्या मराठीतुन बोलताना दिसतात हे चित्र बदलले पाहीजे.

मराठी संकेतस्थळांमुळे सध्यातरी मराठीला चांगले दिवस आल्यासारखे वाटत आहेत, आंतरजालावर मराठी जनांची संख्या झपाट्याने वाढते आहे आणि या चळवळीतुनच मराठी भाषेला जागतीक दर्जा प्राप्त होणार हे निश्चीत.       

Tuesday, November 30, 2010

बहुचर्चीत "जे.पी,सी." आणि नाकर्ते सरकार

देशात नुकत्याच उघड झालेल्या टु ती स्पेक्ट्र्म , कॉमन वेल्थ, आदर्श या महा आर्थीक घोटाळ्यांच्या चौकशीसाठी जेपीसी स्थापन करावी या मागणीवर विरोधक लोकसभेचे अधिवेशन सुरु झाल्यापासुन ठाम आहेत. रोज सुरु होणारी लोकसभा विरोधकांच्या गोंधळामुळे कोणत्याही कामकाजाविना स्थगीत करावी लागत आहे. या होत नसलेल्या कामकाजावर मात्र जनतेचे कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. यामध्ये सरकार मात्र सारे काही माहीत असुनही कोणताच निर्णय न घेता बघ्याची भुमीका घेत आहे. संसदेत कामकाज होवुन जनतेच्या विकासाची, नवनविन लोककल्याणकारी   कामे व्हावीत, नविन विधेयके सादर होवुन त्यावर चर्चा होवुन ती पारीत व्हावीत यासाठी संसदेचे अधिवेशन होत असते आणि विरोधकांनाही या अधिवेशनात सरकारला जाब विचारण्याचा संपुर्ण अधिकार आहे. सरकार विरोधकांची जेपीसी ची मागणी मान्य का करीत नाही हा कळीचा मुद्दा आहे. सरकारला यामध्ये भिती वाटण्याचे काय कारण आहे हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. . जे.पी,सी स्थापन केल्यानंतर  कदाचीत सरकारमधील काही नेत्यांची नावे उघड होतील व सरकारला ते अडचणीचे ठरेल अशी भिती सरकारला वाटत असावी आणि या अगतिकतेतुनच सराकार ही मागणी मान्य करण्यास कचरत असावे असे समजन्यास हरकत नाही. यामध्ये विरोधकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, सरकार मात्र याप्रकरणी नाकर्ते ठरल्याची जनभावना समोर येत आहे, सरकार जे.पी,सी स्थापन न करताच हे अधिवेशन गुंडाळुन टाकील आणि सध्यातरी विरोधकांवर मात करील असे दिसते. 
                                                                                                                        आपल्याला काय वाटते ? 

Monday, November 29, 2010

जगमोगन रेड्डी नी "घराणेशाही" साठी "भुकंप" घडवला ?

राजकारणात घराणेशाही अनादी कालापासुन चालु आहे, आणि आजच्या राजकीय परीस्थीमध्ये ती राजकीय नेत्यांची अपरीहार्यता बनली आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांना मात्र ती काही प्रमाणात अडचणीची ही ठरत आहे, प्रत्येक राजकीय नेत्याचा वारसदार राजकीय दृष्ट्या परीपक्वच असतो असे नाही, त्याला गादीवर बसवल्यामुळे खुप मोठे राजकीय नुकसान त्या पक्षास सोसावे लागत असेल तर अशा वेळी कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न पक्षप्रमुखाला पडतो आणि वारसदाराच्या विरोधात निर्णय गेल्यास पक्षाला बंडखोरीला सामोरे जावे लागते. असाच काहीसा प्रकार सध्या आंध्र प्रदेशात चालु आहे. आंध्र चे मुख्यमंत्री वाय.एस.आर .यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी आपली वर्णी लागावी म्हणुन त्यांचे पुत्र जगमोगन रेड्डी यांनी खुप प्रयत्न केले  परंतू कॉग्रेस पक्षश्रेष्टींनी त्यांना डावलून रोसय्या यांना मुख्यमंत्रीपदी बसवले, वास्तविक पाहता अनुकंपा म्हणून जगमोगन रेड्डी यांना मुख्यमंत्रीपद द्यावे अशी लोकभावना होती परंतु कॉग्रेस पक्षश्रेष्टींनी त्यांना डावलले, जगमोगन रेड्डी यांनी त्यावेळी टोकाचा निर्णय घेतला नाही पण के.रोसय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉग्रेस पक्षश्रेष्टींनी किरणकुमार यांना मुख्यमंत्रीदी बसवताच जगमोगन रेड्डी यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि टोकाचा निर्णय घेत  आपल्या कासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठवुन दिला व आंध्र मध्ये खळबळ उडवुन दिली. महाराष्ट्रात शरद पवारांनी याच मार्गाने जावुन वेगळा पक्ष स्थापन केला व चांगले यश मिळवुन कॉग्रेस ला वठणीवर आणले तसे करण्याचा जगमोगन रेड्डी यांचा प्रयत्न असेल तर त्याला कसा प्रतीसाद मिळतो हे येणारा काळच ठरवेल.

Thursday, November 25, 2010

पाकड्यांनो आम्ही हिंमत हरलो नाहीत...

२६/११ आली 
स्रर्वांनाच आठवलं
पाकीस्तान ने दोन वर्षापुर्वी
अतीरेक्यांना भारतात पाठवलं
इथली निष्पाप माणसं मारायला
चौकाचौकात बॉंब फोडायला
पण शेवटी अतीरेक्यांनो
तुम्हीच हरलात
कारण तुम्ही बॉंब फोडले
अंदाधुंद गोळीबार केला
तरी आम्ही..
आमची जीगर हरलो नाहीत
आमची हिंमत हरलो नाहीत
आम्ही जगासमोर तुम्हाला उघडं केलं
तुम्ही मात्र उघड्या डोळ्यांनी
आमची हिंमत पहात राहीलात
आतल्या आत जळत राहीलात
आमच्या पासुन पळत राहीलात
तुमच्याशी लढताना
आमचे जवान शहीद झाले
पण जाता जाता आम्हाला
जगण्याची जिद्द देवुन गेले
पाकड्यांनो एक दिवस तरी तुम्हाला
दहशतवाद सोडावाच लागेल
आणि दिल्ली पासुन गल्ली पर्यंत
ऐकु जाइल एवढ्या जोरात
"जयहिंद" चा नारा द्यावाच लागेल... 

(२६/११ च्या पाकीस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या सुपुत्रांना भावपुर्ण श्रध्दांजली)
 

................अमोल देशमुख,माजलगांव(बीड)

Monday, November 22, 2010

माणसं देवासारखी अचानक भेटतात तेव्हा...

आम्ही मित्रमंडळी आपल्या काही कामानिमीत्त नुकतेच मुंबई ला गेलो होतो. आम्ही यापुर्वीही मुंबई ला गेलेलो परंतू ते रेल्वेने किंवा बसने, पण या वेळेस स्वत:ची गाडी घेवुन गेल्यामुळे मुंबई मध्ये रस्ते सापडतील का या विचारात वाशी पर्यंत आम्ही विनासायास पोहोचलो, त्यानंतर आमचे काही मित्र तेथे उतरले, आम्हाला छ्त्रपती शिवाजी टर्मीनस ला जायचे असल्यामुळे त्यांनी सांगीतले सरळ या रस्त्याने जा चेंबुर लागेल आणि पुढे विचारत विचारत जा, तास दोन तासात तुम्ही तेथे पोहोंचाल, आम्ही निघालो, परंतु चेंबुर च्या बरेच पुढे गेल्यावर आम्हाला नेमका रस्ता कळेना, एका सिग्नल ला आमची गाडी थांबली आजुबाजुला ब-याच गाड्या येवून थांबल्या पैकी एका गाडीचा चालक सारखा आमच्याकडे पहात असल्याचे आमच्या लक्षात आले, शेवटी त्याने आम्हास बीड चे का असे विचारले आम्ही त्यास तुम्ही कोठे असता वगैरे विचारले असता त्याने मीही बीडचाच असे सांगुन कोठे जायचे आहे असे विचारले आम्ही छ्त्रपती शिवाजी टर्मीनस ला जायचे आहे असे सांगताच त्याने मझ्या मागोमाग या असे सांगुन त्याची गाडी पुढे घेतली, आम्ही ब-याच प्रमाणात चिंतामुक्त झालो, साधारणपणे अर्धा तासात त्याने आम्हाला छ्त्रपती शिवाजी टर्मीनस ला नेवुन पोहोचवले आम्ही आनंदीत झालो परंतू त्या अज्ञात मदतगाराचे आभार मानण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही कारण अनेक वाहनांच्या गर्दीत तो कुठे नाहीसा झाला हे काही आम्हाला कळाले नाही आम्ही दिवसभर आमच्या कामात व्यस्त राहीलो परंतू त्या अज्ञात मदतगाराचे साधे आभारही मानु शकलो नाही याची दिवसभर हुरहुर लागुन राहीली, एखाद्या कठीण प्रसंगात अशी माणसं देवासारखी अचानक येतात आणि आपल्याला मदत करुन निघुन जातात तेव्हा खरा माणूसकीचा प्रत्यय येतो, आपण त्यांचे साधे आभारही मानु शकत नाहीत किंवा त्यांना काहीच देवू शकत नाहीत तेव्हा खुप कसेतरी वाटते, जगात दिशाभुल करणारी माणसेही खुप भेटतात परंतू योग्य दिशा दाखवून मदत करणारी माणसे तशी अभावाने भेटतात त्या अज्ञात मदतगाराचे मनापासुन आभार फक्त या माध्यमातुन मांडणेच आपल्या हातात आहे, यानंतर मी मात्र एवढेच करु शकतो की मीही कधीतरी अशीच कोणाला तरी त्याच्या अडचणीच्या काळात त्याला मदत करुन त्या अज्ञात मदतगाराचे रुण फेडू शकेल एवढेच... 

कधी संपणार या मालीका ?

हिंदी असो वा मराठी
बहु असो वा बालीका
टिव्ही लावला की
दिसतात त्याच त्याच मालीका
किती वर्षे झाली तरी
सासूचे चार दिवस
काही संपत नाहीत
रोज तेच तेच ऐकूण
पेक्षकांचे कान कसे विटत नाहीत
मालीका पाहुन प्रेक्षक म्हातारा झाला
पण मालीकातल्या सासू अन सुना
दोघीही सारख्याच तरुण दिसतात
मालीकातील सारीच नाती
आतुन पोखरलेली
बहुतेक वरुनच ती तशी भासतात
टीव्ही वर बहु असो वा बालीका
अरे देवा खरच
कधी संपणार या मालीका ?

Friday, November 19, 2010

एकदाचा शपथविधी झाला

महाराष्ट्राच्या जनतेला
नविन सरकार बद्दल
अनेक प्रश्न पडले होते
पण नव्या सरकारचे घोडे
संख्येवरुन अडले होते
एकदाचा शपथविधी झाला
आता महाराष्ट्राच्या विकासाची
घोषणा ही ते करतील
नवे मंत्री मात्र
जुन्यांचा आदर्श घ्यावा
की नवाच मेवा खावा
या विचारात पडतील

Thursday, November 18, 2010

ओबामांना प्रश्न पडला..

ओबामा आले
आम्ही दाखवलेला देश पाहुन खुश झाले
हा देश महासत्ता होणार असे बोलुन गेले
इथे तर अनेक घोटाळे करुन
नेते पांढ-या कपड्यात सजले होते
ओबामांना हार घलणा-या अनेक नेत्यांचे
आदर्श सोसायटी मध्ये मजले होते
अमेरीकेत गेल्यावर त्यांना हे कळाले
तेव्हा त्यांना प्रश्न पडला
नेत्यांनी इतके घोटाळे करुनही
हा देश दिमाखात उभा कसा राहीला
त्यांना काय माहीत
नेते कसेही असले तरी
या देशातील जीगरबाज जनतेनेच
खरं तर हा देश आजपर्यंत सांभाळला

माझ्या मनाला वाटतील त्या विषयावरील या चारोळ्या..

१) डोंबारीन

दोरीवरुन चालताना
डोंबारीन खाली कधीच पडत नसते
कारण दोरी एवढाच रस्ता आहे
ही जाणीव तिने जपलेली असते...

२) सारं कसं छान आहे..

ओबामा आले आणि म्हणाले
या देशात सारं कस छान आहे
त्यांना काय माहीत
इथे तर घोटाळ्यांच रान आहे



३) पाऊस रे...

पावसाने माझे मन ओलेचिंब भिजले,
मनातील कोरडेपण मग जागीच थीजले,
पावसाच्या धारा अनं भिरभिरणारा वारा,
मनातील भावनांचा मग फुलेल पिसारा ...

(यावर्षी पाऊस खुप झाला,पावसाळ्याच्या सुरुवातीला या चार ओळी सुचल्या होत्या)

Monday, November 15, 2010

चाळीस लाखाचा इमला..

माहीतीच्या अधिकाराने आता
एक नेताही नाही सोडला
नव्या मुख्य्मंत्र्यांचा
चाळीस लाखांचा बंगला
त्यांना की हो लगेच गावला

Friday, November 12, 2010

भ्रष्ट्राचाराचा शाप

महाराष्ट्रात पृथ्वीराज आले
आता कॉग्रेसी नेत्यांना
कोणताच घोटाळा माफ नाही
कारण दिल्लीला माहीत आहे की
महाराष्ट्रात आदर्श घोटाळ्यात गुंतलेला
कोणताच हात तसा साफ नाही
प्रत्येक नेता कोणत्या ना कोणत्या
आरोपांनी घेरलेला
प्रत्येकाचाच खजीना
काळ्या पैशानेच भरलेला
महाराष्ट्राच्या राजकारणातील नेत्यांना
हा भ्रष्ट्राचाराचा शाप आहे
नेते तर नेतेही तसेच
भ्रष्ट्राचाराच्या बाबतीत
नोकरशहा तर त्यांचा बाप आहे.

Tuesday, November 9, 2010

आदर्श घोटाळा

शहीदांचे भुखंडाचे श्रीखंडही
यांना पुरले नाही
कितीही खाल्ले तरी
यांचे पोट काही भरले नाही
कारगील युध्दातील शहीदांचा
भुखंडही यांनी लाटला
कॉंग्रेसच्या आदर्श घोटाळ्याचा बुरखा
किती टराटरा फाटला

Wednesday, October 27, 2010

ठाक-यांच्या भांडणाचा लाभ कोणाला ?

कल्याण-डोंबीवली महानगरपालीकेची निवडणूकीत शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत, त्यांच्या आरोप प्रत्यारोपांनी राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. शिवसेनेने शिवाजी पार्कवरीय सभा शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थीत घेतली, त्यानंतर राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबीवली त घेतलेल्या सभालाही मोठ्या संख्येने कल्याण-डोंबीवली करांनी उपस्थीती लावली. तेथील सभेत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर व त्यातली त्यात शिवसेनाप्रमुखांवर ज्या पध्द्तीने आरोप केले त्याने मात्र शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. त्याला  शिवसेनाप्रमुखांनी सामना मध्ये ठाकरी शैलीने ज्या पध्द्तीने प्रत्युत्तर दिले ते पाहुन हे मतभेद वाढतील अशी शक्यता राजकीय गोटातून व्यक्त होत आहे.

शिवसेना आणि मनसे यांच्या भांडणात कॉग्रेस मात्र आपला फायदा करुन घेईल अशी चिन्हे दिसत आहेत. मनसे ने उत्तर भारतीयांविरोधात केलेले आंदोलन, मागील ४५ वर्षापासुन मराठी माणसाचा पक्ष म्हणून शिवसेनेने तयार केले वातावरण याला दोघातील अंतर्गत भांडणामुळे छेद जाईल आणि मराठी मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होवुन शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांनाही त्याचा फटका बसेल. राष्ट्र्वादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्रीय कॉग्रेस हेही या निवडणूकीत आपल्या पुर्ण सामर्थ्यानिशी या निवड्णूकीत उअरले आहेत आणि त्यांना या  निवड्णूकीत नक्कीच चांगले यश मिळेल अशी चिन्हे आहेत. काय होईल ते येणारा काळच ठरवेल.  

Tuesday, October 26, 2010

ठाण्यातील ठाकरी भांडण...

ठाण्यात ठाक-यांचा
ठाक-यांशी सामना रंगला
नात्यात शिल्लक राहीलेला एक धागा
त्यांच्या बोलण्याने भंगला
सत्ता येतील आणि जातील
टिका करुन नाती टिकतील का हो
राजकीय बाजारात मग ते
मराठी माणसाची स्वप्न विकतील का हो
भांडण लावले ज्यांनी
ते गालातल्या गालात हसतील
दोघांचीही कशी जीरली म्हणत
हा तमाशा बघत बसतील

Friday, October 22, 2010

घराणेशाही

राजकारणातील घराणेशाही
आता सगळीकडेच शिरली
लायकीपेक्षा नातीच मग
महत्वाची ठरली
डॉक्टर चा मुलगा 
डॉक्टर होतो
शिक्षकाचा शिक्षक
मग आम्हीच का करु नये
अशी पुस्तीही त्यांनी जोडली
दिल्ली पासुन गल्ली पर्यंत
सर्वच पक्षात घराणेशाही मुरली आहे
राजकारणातील ही गोष्ट नवी नाही
महाभारतातील ध्रुतराष्ट्रापासुनच
ती राजकारणात शिरली आहे...

Wednesday, October 20, 2010

राष्ट्रकूल स्पर्धेतील शायनींग "सायना"



राष्ट्रकूल स्पर्धेत भारताने तब्बल ३८ सुवर्णपदकासह १०१ पदके जिंकुन दुसरे स्थान पटकावत ईग्लंडला मागे टाकले. राष्ट्रकूल स्पर्धा सुरु होण्याच्या अगोदर १ महिना गाजत होती ती भ्रष्ट्राचारच्या व निकृष्ट दर्जाच्या कामाच्या चर्चेमुळे, परतू त्यानंतरही स्पर्धा मात्र यशस्वीपणे व दिमाखात पार पडली.स्पर्धेच्या संयोजनाविषयी जगभरातुन समाधान व्यक्त झाले. राष्ट्रकूल स्पर्धेत पदके मिळवणा-या सर्वांनीच भारताची शान जगभरात वाढवली.सर्वांचेच भारतीयांनी मनापासुन अभिनंदन केले.
राष्ट्रकूसल स्पर्धेत वैयक्तीक क्रिडाप्रकारामध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगीरी केली, त्यामध्ये बॅडमिंटन मध्ये सायना नेहवालची शायनींग कामगीरी लक्षवेधक ठरली कायम स्मरणात राहण्यासारखी झाली. सायना मागील दोन वर्षापासुन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने चमकत आहे. राष्ट्रकूल स्पर्धेत सायनाने अटीतटीच्या झालेल्या अंतीम सामन्यात मलेशीयन बॅडमिंटन पटूचा पराभव करुन सुवर्णपदक पटकावले. अंतीम सामन्यात सायनाने पहीला सेट गमावल्यानंतर ज्या आत्मविश्वासाने नंतरचे दोनही सेट जिंकले तीची ती जिगर वाखानण्याजोगी होती. बॅडमिंटन सारख्या वैयक्तीक खेळामध्ये आपले करीअर करु ईच्छीना-या बॅडमिंटन पटूंना सायनाचा आदर्श घ्यावा लागेल, आता ऑलींपीक मध्ये सुवर्णपदक पटकावुन सायना नेहवालने भारताची सुवर्णपदकाची भुक संपवावी तरच तीची कामगिरी आणखी शायनींग ठरेल.

Wednesday, October 13, 2010

क्रिडा क्षेत्र होवु शकते का करिअर ?


प्रत्येक पालकाला वाटते आपल्या पाल्याने काहीतरी वेगळ करावं, वेगळा मार्ग निवडावा, एखाद्या क्षेत्रात नांव कमवावे आणि त्यासाठी त्यांची  अव्याहत धडपड चालु असते. काहींना क्रिडा क्षेत्रात मुलाने नांव कमवावे वाटते परंतु त्यातील बहुतांशी जनांचे आपला मुलगा क्रिकेटर व्हावा हेच स्वप्न असते कारण इतर क्रिडा प्रकारांपेक्षा क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंना मिळणारे मोठे ग्लॅमर मिळते, प्रचंड प्रमणात मिळणारा पैसा मिळतो. खुप प्रयत्न करुनही भारतीय संघांत स्थान मिळाले नाही तरी रणजी किंवा एखाद्या परदेशी क्लबशी करार करुन करिअर करता येते, नव्यानेच सुरु झालेल्या आय.पी.एल. मुळे तर क्रिकेटमध्ये पैश्याचा पाउस पडत आहे आणि यामुळेच पालकांनी आपला मुलगा क्रिकेटपटूं व्हावा हे स्वप्न पहाणं स्वाभाविक आहे. क्रिकेटव्यतीरिक्त इतर क्रिडाप्रकारामध्ये करिअर करण्याबद्दल पालकांचाच काय मुलांचाही तितकासा ओढा दिसुन येत नाही.
    इतर क्रिडाप्रकारात विषेशत: वैयक्तीक क्रिडाप्रकारंमध्ये म्हणजे नेमबाजी, बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस, भारोत्तोलन, कुस्ति, बॉक्सींग, यामध्ये करिअर करायला खुप संधी आहेत. पालकांनी आपल्या पाल्याच्या शारीरिक क्षमतेचा,त्याच्या खेळाविषयीच्या आवडीचा विचार करुन त्याला प्रोत्साहीत करावे, त्याला चांगला प्रशीक्षक मिळवून द्यावा, त्याने मेहनत घेतली तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणे शक्य होईल. आणि या क्रिडाप्रकारांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पदक मिळवणे व हाच यशस्वीतेचा मुख्य निकष असतो आणि पदके मिळवण्यामधील सातत्यामुळे खेळाडूची कारकीर्द घडते युथ गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशीयन गेम्स, ऑलींपीक अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधुन पदक मिळवल्याशिवाय खेळाडूंना राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त होत नाही. पदक मिळवणा-या खेळाडूंना मात्र काही प्रमाणात पैसा ही मिळतो आणि रेल्वे, सरकारी विमानकंपन्या, पोलीस खाते अशा ठिकाणी चांगली नोकरी मिळू शकते.
    इतर क्रिडाक्षेत्रात करिअरला खरोखरच वाव आहे परंतू त्यासाठी अपार मेहनत, मोठा खर्च याची निनांत आवशकता आहे. सरकारने (क्रिडा खात्याने) खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर आपला एशीयन गेम्स, ऑलींपीक  मधील पदकांचा दुश्काळ संपेल. चालु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भालाफेकीत भारतीय महिला ८ व्या  व ९ व्या क्रमांकावर आल्या, त्यांनी परदेशी खेळाडूंचे फायबरचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भाले पाहुन केवळ उच्च दर्जाचे साहीत्य नसल्यामुळे आम्ही पदकापासुन वंचीत राहीलो अशा प्रतीक्रिया खेळाडूंकडून आल्या. तर सर्वच क्रिडा प्रकारामध्ये तयारीबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडा साहीत्य ही अत्यंत आवश्यक आहे.
    आपले संपुर्ण आयष्य खेळासाठी खर्च घालणा-या अ‍ॅथलिट्स ना निवृत्ती घेतल्यानंतर फार हलाखीचे जीवन जगावे लागते, सरकार त्यांची जबाबदारी घेत नाही, अशा ब-याच कारणांमुळे क्रिडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे येत नाहीत.

Wednesday, October 6, 2010

पाकीस्तानी कलाकार बीग बॉसच काय कुठेच नकोत...

फक्त भारतव्देष हीच ज्यांची संस्कृती आहे त्यां पाकीस्तानी कलाकारांना भारतामध्ये  बोलवतात कशाला हा प्रश्न सध्या तमाम भारतीयांना पडलेला आहे. पाकीस्तानी कलाकारांना भारतात बोलावुन काही वाहीन्या देशविरोधी कारवाया करण्यात धन्यता का मानतात, त्यांना जाब विचारनारा या देशात कोणीच नाही का, संपर्ण भारतामध्ये भारतातील कोणत्याच कार्यक्रमामध्ये पाकीस्तानी कलाकारांना  सामील करुन घेवु नये या मताचा मी आणि समस्त देशप्रेमी मंडळी आहेत , बर ही पाकीस्तानी कलाकार मंडळी पाकीस्तानचा भारतव्देष संपवण्याचा कधीही प्रयत्न करताना दिसुन येत नाहीत. भारताविरुध्द कायम अतिरेकी कारवाया करणा-या, भारतात अशांतता माजवणा-या पाकीस्तानी नेत्यांची कानउघडनी करताना दिसत नाहीत मग त्यांना बोलावुन या वाहीन्या फक्त टीआरपी वाढवण्यासाठीच हा उपद्व्याप करतात असे समजायचे का. पाकीस्तानी कलाकारांना भारतामध्ये येवू न देण्याचा पवित्रा काही राजकीय पक्ष घेतात मात्र त्यांना सरकारकडून वा मतांच्या लाचारीसाठी लांगुलचालन करणारे राजकीय पक्ष विरोध करतात, उलट अशा पाकीस्तानी कलाकारांना खेळाडुंना संरक्षण पुरविण्यात ही मंडळी धन्यता मानतात आणि खेळामध्ये, कलेमध्ये राजकारण आणू नये असा दांभीकपणाही मिरवतात. पाकीस्तानी कलाकारांच्या विरोधात आंदोलन करणा-या पक्ष, संघटनेच्या कार्यकर्त्यांवर खटले भरतात. हे सर्व भारतातील जनता मात्र निमुटपणे, त्रयस्थपणे पहात राहते.
जनतेने हे सारे त्रयस्थासारखे न पाहता याला आपल्यापरीने विरोध केला पाहीजे, अशा वाहींन्यांवर अशा कार्यक्रमांना पुरस्कृत करणा-या उत्पादनांवर बहीष्कार घातला पाहीजे , भारतविरोधी कारवाया करणा-या पाकीस्तानला, तेथील कलाकारांना, खेळाडुंना, राजकीय नेत्यांना भारतात प्रवेश नाकारलाच पाहीजे तरच "भारत माता की जय" सार्थ वाटेल.

Tuesday, September 21, 2010

११० वर्षाचा नवसाला पावणारा टेंबे गणपती...

महाराष्ट्रात १०० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची परंपरा असनारे जे मोजके गणपती आहेत त्यामध्ये माजलगांव जि.बीड (मराठवाडा) येथील नवसाला पावणारा धुंडीराज टेंबे गणपती प्रसिध्द आहे. ११० वर्षाची ऐतिहासीक परंपरा असलेला टेंबे गणपती गणेश चतुर्थीला स्थापन न होता भाद्रपद शुध्द एकदशीला स्थापीत होतो व त्याचे विसर्जन देखील अनंत चतुर्द्शीला न होता प्रतीपदेला होते. असे का ,त्याची परंपरा अशी का पडली त्याला संघर्षाचा इतिहास आहे. त्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालेले नव्हते, मराठ्वाडात इंग्रजाचा मांड्लीक निजाम याची राजवट होती, त्यावेळी टेंबे गणेशाची मिरवणुक काही समाजकंटकांनी अडवली होती, त्यामुळे त्याजागेवरच गणपतीची मुर्ती ठेवुन टेंबे गणेशाच्या संस्थापक ब्राम्हण मंडळींनी हैद्राबादच्या निजामाकडे जावुन त्याच्याकडुन ताम्रपत्रावर परवानागी आणली व त्यानंतर वाजतगाजत मिरवणुक काढण्यात आली, त्यामुळे आजतागायत टेंबे गणेशाची भाद्रपद शुध्द एकदशीला स्थापना होते व विसर्जन  प्रतीपदेला होते. त्याकाळी नवसाची पुर्ती होण्यासाठी भाविक भक्त हाती मिरवणुकीत टेंबा धरत, त्यांचे नवस पुर्ण होत ती परंपरा आजही कायम आहे, या नवसाच्या टेंब्यामुळेच या गणपतीचे नांव टेंबे गणपती पडले. नवसाला पावाणारा टेंबे गणपती म्हणुन या गणपतीची किर्ती आज उभ्या महाराष्ट्र्भर पसरलेली आहे, या टेबे गणेशाचे दर्शन घेण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन गणेशभक्तांची रीघ लागलेली असते. या गणेशाची ७ ते ८ फुटी मुर्ती येथील मुर्तीकार गोंदीकर हे  स्वत: तयार करतात. सर्व गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर टेंबे गणेशाचे विसर्जन असल्यामुळे टेंबे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत सर्वच जातीधर्माचे लोक मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहाने सामील होतात. अशा ११० वर्षाचा नवसाला पावाणारा  टेंबे गणपतीचे दर्शन घ्यायला आपण एकवेळ जरुर  यावे...
  

Sunday, September 19, 2010

रस्त्यावर होल मग नो टोल

रस्त्यावर जर खड्डे पड्ले असतील तर टोल देवु नका असा तोंडी आदेश सरकारमधील जबाबदार, लोकप्रीय गृहमंत्र्यांनी दिल्यामुळे वाहनधारंकांना आनंद झाला. मागील १० ते १५ वर्षापासुन महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महामार्गांवर असे टोलनाके वाहनधारंकांचे खिसा कापित होते. टोल वसुलीची मुदत संपल्यानंतर सुध्दा हे ’टोळ’ टोल वसुली करत होते. बहुतेक टोलनाके राजकीय नेत्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी किंवा गुंड पाळु शकणा-या धनदांडग्यांनी चालवायला घेतलेले होते त्यामुळे प्रेमाने कमी आणि सक्तीने जास्त यापध्द्तीने वाहनधारंकांकडुन टोलवसुली केली जात होती. प्रवासाला निघताना पेट्रोल, डिझेल नंतर टोल लाच पैसे मोठ्या प्रमाणावर लागायचे. टोल वसुलीची मुदत संपल्यानंतर सुध्दा टोल घेणा-या टोलधारकांच्या विरोधात अनेक वेळा तक्रारी करुन सुध्दा संबधीत खात्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे मागील १० ते १५ वर्षात कधी घडले नाही. ईंग्रजांच्या काळात अशी सक्तीने करवसुली चालायची, त्यावेळी कर चुकवना-यांना ईग्रज अधिकारी चाबकाने फोडून काढायचे आता टोल नावाचा कर एखाद्याने चुकवायचा प्रयत्न केल्यास काय घड्ते याचा अनुभव न घेतलेलाच बरा.   
"बी.ओ.टी." (बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा)    या संकल्पनेतुन अनेक पुल आणि रस्ते बांधण्यात आले. मात्र बांधकाम खात्याने त्यांच्या गुणवत्तेकडे सर्रास दुर्लक्ष केले त्यामुळे वर्षाच्या आतच या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पड्ले. वाहनधारक अशा रस्त्यांवर खड्ड्यांमधुन मार्ग काढत टोल नाक्यावर टोल भरायचे, काहीजन तक्रार करायचे परंतु अशा तक्रारींना केराची टोपली दाखवली जायची.
सध्या तर "बी.ओ.टी."  तत्वावर अनेक रस्ते, पुल यांना मंजुरी दिली जात आहे, खाजगीकरणातुन असे रस्ते बांधले जात असल्यामुळे त्यांच्या दर्जाकडे पुर्णत: दुर्लक्ष करण्यात येते (काही अपवाद वगळता) आणि असे रस्ते लवकर खराब होतात, मात्र त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करुन संबधीत कंपनी टोल वसुल करण्याचे काम मात्र हक्काने करते. आता जनतेतुन याला विरोध होत आहे, मनसे ने आपल्या स्टाईलने असाच एक टोलनाका बंद पांडल्याचे नुकतेच वाचनात आले, आता गृहमंत्र्यांनी "रस्त्यावर होल मग नो टोल" हा नारा दिल्यामुळे तरी रस्त्यांची अवस्था सुधारेल अशी आशा करायला काय हरकत आहे. गृहमंत्र्यांच्या या आदेशाचे सरकारने मनावर घेतले आणि तसा निर्णय जाहीर करुन जनतेला दिलासा दिला तर तो सुदिन म्हणावा लागेल.

Thursday, September 16, 2010

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दीक शुभेच्छा...

१७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदिर्घ लढ्यानंतर हैदराबाद  मुक्ति संग्रामाची परिणती १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासना विरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतदेशात सामावुन घेतेले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. तो दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांची राजवट संपली आणि भारतास स्वातंत्र्य मिळाले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला.१ मे १९६० पासून नविन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला.
स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद राज्या चा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.स्वामी रामानंदतीर्थ,गोविंदभाई श्रॉफ हे हैदराबाद मुक्तीसंग्राम चे अर्ध्वयू होते. स्वामी रामानंदतीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भवानराव खेडगीकर) हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे मराठी चळवळकर्ते होते.  स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक गोविंदभाई श्रॉफ यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत मोलाचे कार्य केले.
मराठ्वाडा मुक्ती संग्रामात ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्रविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्रविरांना मानाचा मुजरा.
सर्व मराठ्वाडा वासीयांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दीक शुभेच्छा...

Tuesday, September 14, 2010

सल्लुमियाचा बालीशपणा..

२६/११ चा मुंबई वरील दहशदवादी हल्ला हा श्रीमंतांवर झालेला हल्ला होता म्हणुन त्याचा अधिक बोलबाला झाला, त्या अतिरेकी हल्ल्यात शेजारच्या देशाचा हात नव्हता अशी मुक्ताफळे सल्लुमियाने उधळली,  बालीश वक्तव्ये करुन प्रसिध्दी मिळवण्याचा स्टंट सल्लुमियाच्या चांगलाच अंगलट आला, अशी विधाने करुन त्याला काय साधायचे होते हे त्याचे त्यालाच माहीत. कदाचित वादग्रस्त विधान करुन चर्चेत येवुन त्याच्या दबंग ला प्रसीध्दी मिळवुन देण्याचा त्याचा प्रयत्न असावा, तसे असेल तर तो प्रयत्न फसला असेच म्हणावे लागेल.
    मुंबई मध्ये ताज,ओबेराय वर हल्ला झाला तेथे फक्त श्रीमंताचेच वास्तव्य असते असे त्याचे म्हणने होते परंतु त्याचवेळी जे.जे. हॉस्पीटल, कामा हॉस्पीटल, सी.एस.टी. येथेही दहशदवाद्यांनी हल्ला करुन मोठ्या संख्येने निश्पाप नागरिकांना मारले हे सल्लुमिया विसरला आणि बेलगाम वक्तव्य करुन गेला. असे विधान करुन सलमान खान ने मात्र आपले हसे करुन घेतले. सरकारने त्याच्या या वक्तव्याची गांर्भीयाने दखल घेवुन त्याला फटकारायला हवे होते, परंतु सलमानवर ताबडतोब सर्वबाजुंनी टीका झाल्यावर त्याने माफी मागुन या वादातुन आपली सुटका करुन घेण्याचा केविलवाना प्रयत्न केला. काही दिवंसांपुर्वी सलमानने आपल्या गाडीखाली फुटपाथवर झोपलेल्या काही लोकांना चिरडले होते ते गरीबच होते, त्यावेळी त्याने आपण सेलेब्रीटी असल्यामुळेच या प्रकरणाला जास्त प्रसीध्दी देण्यात आली असा कांगावा केला होता. सलमान खान ने यापुढेतरी अशी बेलगाम वक्तव्ये करु नयेत अशीच सर्वांची अपेक्षा असणार..
     

Friday, September 10, 2010

जातीयवादाची ही विषारी फळे खरचं कोणी चाखायची....

आम्ही भारतीय
आम्ही महाराष्ट्रीयन
आम्ही या मातीचे
हे सारं मागे पडलं हो..
आता
आम्ही या जातीचे
आम्ही त्या जातीचे
जातीनिहाय....
आमचे नेते वेगळे
आमचे रंग वेगळे
आमचे झेंडे वेगळे
आम्ही त्यांचा द्वेष करणार
ते आमचा द्वेष करणार
आमच्या अंगणात फुलाचे झाड नाही पण
जातीची ही विषवल्ली मात्र
आम्ही सर्वांनीच जोपासली
त्याला नेत्यांनी व्यवस्थीत खतपाणी घातले
सरकारने आधार दिला
त्याची कडु फळे मात्र चाखावी लागतील
आमच्या येणा-या पिढीला
आम्ही त्यांना काय देतोय
सुरक्षीत भविष्य का
जातीची ही विषारी फळे..
खरच विचार करा

वादग्रस्त लिखाण करुन ब्लॉग वाचकप्रीय बनवता येत नाही...

सध्या मराठी ब्लॉग ची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. ब्लॉगवर कवीता, लेख, ललीत, गड किल्ल्यांची माहीती ,सामाजीक, चिंतनीय,विनोदी, किंवा समाज उपयोगी साहीत्य ब-याच प्रमाणात लिहीले जाते अशा ब्लॉग ना मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग मिळतो आणि अशा ब्लॉग ना भेट देवुन चांगल्या लेखांना, कवितांना वाचुन आपले अभिप्राय नोंदवता येतात परंतु आजकाल काही माथेफीरु, स्वयंघोषीत विद्वान आपल्या ब्लॉगमधुन वादग्रस्त लिखान करुन वाचकांचे लक्ष आपल्याकडे वळवण्याचा केविलवाना प्रयत्न करताना दिसत आहेत, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला फारसे कष्ट पडत नाहीत पण आपली लेखणी अशांसाठी का झीजवायाची, अशा माथेफीरुंना उत्तर म्हणजे त्यांच्या ब्लॉगकडे दुर्लक्ष करणे, त्यांना फारशी किंमत न देणे. बर हे स्वयंघोषीत विद्वान थोर इतिहासकार, इतिहासातील थोर सेनानी ज्यांना जगमान्यता लाभलेली आहे, ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पुर्णच होवु शकत नाही अशा जेष्ठ विभुंतींबद्दल अपशब्द वापरुन स्वत:ला प्रसीध्दी मिळवण्याचा प्रयत्न करताना वारंवार दिसतात, मराठीसुची संकेतस्थळावर असाच एक "बी" ग्रेड किंवा "सी" ग्रेड लेखाचे फक्त शिर्षक माझ्या पाहण्यात आले अशा लोकांना उत्तरेच देवु नयेत त्यांचा माथेफिरुपणा कमी होईल.

Tuesday, September 7, 2010

एस.एम.एस. संग्रह..

दिवस ईवल्याश्या पक्षांसारखे असतात
भुर्रकन उडून जातात..
आणि मागे ठेवतात आठवणींची पिसे
काही पांढरी, काही काळी
काही मऊ काही खरखरीत
आपण जमतील तेवढी गोळा करायची
गुंफून बनवायची
एक आठवणींची चटई
जीवनाच्या संध्याकाळी
निवांत पडण्यासाठी..........

मातृदिनानिमीत्त....

शिंपल्यात पाणी घालुन
समुद्र दाखवता येत नाही
हाताने काढलेल्या फुलाला
सुगंध येवु शकत नाही
निळ्याभोर गगनाचा
अंत काही होत नाही
अन
आईच प्रेम
शब्दात व्यक्त होत नाही....

मातृदिनानिमीत्त हार्दिक शुभेच्छा...

Friday, September 3, 2010

"ज्ञानाची बचत हीच ज्ञानाची निर्मीती"..मा.रामदासजी फुटाणे यांनी सांगीतलेला मजेशीर किस्सा..

आमच्या माजलगांव येथे रोटरी क्लबच्या २०१० च्या पदग्रहण समारंभात प्रसीध्द कवी, वात्रटीकाकार मा.आ.रामदासजी फुटाणे यांनी आपल्या भाषणातुन सांगीतलेला हा गंमतीशीर किस्सा.
    महाराष्ट्राच्या उर्जा खात्याने वाढलेल्या विजेच्या समस्येवर उपाय करायचे ठरवले, विजेची मागणी जास्त आणि विजेची निर्मीती कमी यामुळे "लोडशेडींग" चा पर्याय ही शासनानेच काढला होता त्यापुढे जावुन "विजेची बचत हिच विजेची निर्मीती"  ही संकल्पना राबवायचे असे उर्जामंत्र्यांनी ठरवले,  उर्जा खात्याच्या सर्व उच्च अधिका-यांच्या बैठ्कीत ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे ठरले, त्यानुसार राज्यातील प्रत्येक शहरात, गावांत वाड्या वस्त्यांवर या योजनेच्या प्रसीध्दीसाठी मोठे मोठे  बॅनर लावायचे ठरले, त्यासाठी लाखो रुपयांचे बजेट मंजुर करण्यात आले, राजकीय चालीरिती प्रमाणे बॅनर लावायचे काम ज्याला द्यायचे होते त्याला देण्यात आले, बॅनर लावायचे काम पुर्ण झाल्यानंतर याचा अहवाल उर्जामंत्र्यांना देण्यात आला. उर्जामंत्र्यांनाही रोज मंत्रालयात जाताना, दौ-यावर असताना या "विजेची बचत हिच विजेची निर्मीती" योजनेचे लाईटच्या झगमगाटातले मोठे बॅनर दिसु लागले, परंतु उर्जा खात्याला त्याचा फारसा प्रभाव जाणवत नव्हता, एवढा गाजावाजा, जाहीरात करुनही फारसा फरक का पडत नाही हे कोणालाच कळत नव्हते शेवटी मत्र्यांनी ग्रामीण भागात जावुनच खरे चित्र पहायचे ठरवले.
    मंत्री पाहणी करण्यासाठी ग्रामीण भागाच्या दौ-यावर निघाले, एका गावांत जाण्यासाठी त्यांच्या गाड्यांचा ताफा आत वळला, वळणदार रस्त्यांनी "वळसे" घेत "वळसे" घेत त्यांनी गावात प्रवेश केला, गावाच्या वेशीजवळ त्यांना "विजेची बचत हिच विजेची निर्मीती" योजनेचे मोठे बॅनर दिसले तेथे त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला, त्यांना पाहुन गावक-यांनी त्यांच्यापाशी गर्दी केली मंत्री महोदयांनी गावक-यांना विज बचतीबद्दल सांगुन लोड्शेडींगच्या त्रासातुन लवकर मुक्तता हवी असेल तर विजेची बचत किती आवश्यक आहे हे समजावुन सांगीतले, त्यानंतर गावातल्या इतर शासकीय योजना, गावातील दवाखाना, शाळा याबद्दल विचारले त्यावर गावक-यांनी सर्वकाही ठीक आहे परंतु शाळा मात्र बंद आहे असे उत्तर दिले, मंत्री महोदयांनी शाळा का बंद आहे हे वारंवर विचारले असता गावक-यांनी मंत्री महोदयांना एकसुरात उत्तर दिले की "ज्ञानाची बचत हीच ज्ञानाची निर्मीती" त्यानंतर मात्र मंत्री महोदयांनी कपाळावर हात मारुन घेत तेथून काढता पाय घेतला...........

Wednesday, September 1, 2010

खाजगी शाळांची शुल्कवाढ

"विनाअनुदानीत खाजगी शाळांना फीवाढीचा अधिकार"  पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी बातमी, न्यायालयाने सरकारचे आदेश रद्दबदल केले मात्र खाजगी शिक्षणसंस्थांना मनाला वाटेल तेवढी फीस घेण्याचे अधिकारच बहाल झाले. विनाअनुदानीत खाजगी शाळांच्या शुल्क निश्चीतीसाठी शासनाने जी.आर. काढलेले असतानासुध्दा विनाअनुदानीत खाजगी शाळा या आदेशाला केराची टोपली दाखवत होत्या. सरकारच्या या आदेशाला न जुमानता त्या भरमसाठ फीस घेत होत्या. या फीसवाढीच्या विरोधात पालकांनी मोर्चे काढले, रस्ता रोको, शाळांना कुलुप ठोकने अशा प्रकारची आंदोलने केली, मोठ्या प्रमाणावर एकजुट दाखवली परंतू न्यायालयाच्या या निर्णयामुळे पालकांचा संघर्षाला खिळ बसली, न्यायालयाच्या या निर्णयामुळे पालकवर्ग अस्वस्थ आहे. आता शासन विनाअनुदानीत खाजगी शाळांच्या शुल्कनिश्चीती प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवु शकत नाही. यापुढे शैक्षणीक पात्रता असुनही  केवळ आर्थीक दुर्बलतेमुळे बहुतांश विद्यार्थ्यांना या शाळांमधुन प्रवेश मिळणार नाही. श्रीमंत पालक आपल्या मुलांना पाहीजे तेवढी फीस भरुन अशा प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेश देतील, मात्र सरकारला यापुढे तरी विनाअनुदानीत खाजगी शाळांच्या शुल्कनिश्चीती प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करुन अशा पालकांना दिलसा देवु शकेल मात्र हे सर्व सरकारच्या इच्छाशक्तीवर अवलंबुन आहे, कारण, यातील बहुतांश संस्था या नेतेमंडळींच्या आहेत, आणि त्यावर लगाम घालणे इतके सोपे नाही...

खाजगी शाळांची शुल्कवाढ
आता त्यांची मक्तेदारी झाली
सर्वांना मोफत शिक्षण
ही संकल्पनाच आता कालबाह्य झाली...
कितीही फीस घेतली तरी आता
शासनही हतबल झाले
या शिक्षणसंस्थांना मात्र
चरायला मोकळे रान मिळाले...  

क्रिकेटपटुंवर बंदी ची मागणी

अ‍ॅलन लॅंब  (इंग्लंडचा माजी क्रिकेटपटु) ची मागणी......
त्या पाकीस्तानी क्रिकेटपटुंवर बंदी घाला
मग मॅच फिक्सींग बंद होइल..
पुढे काय होइल....
पाकीस्तानी संघातील जुने खेळाडू जातील
त्यांच्या जागी नविन खेळाडू येतील
परत फिक्सींग सुरु करतील
आसिफ, आमेर, अकमल, बट तर मग
नक्कीच बुकी बनतील..
खेळ नको पाकीस्तानी क्रिकेटर्सना फक्त पैसा हवा आहे
पाकीस्तानी क्रिकेटचा हा चेहरा
जगासाठी थोडाच नवा आहे...

Saturday, August 28, 2010

पाउस...

पावसाने माझे मन ओलेचिंब भिजले,
मनातील कोरडेपण मग जागीच थीजले,
पावसाच्या धारा अनं भिरभिरणारा वारा,
मनातील भावनांचा मग फुलेल पिसारा ...

Friday, August 27, 2010

किव करा त्यांची

द्वेषात त्यांच्या
त्यांचाच पराभव आहे
किव करा त्यांची
त्यांचा विवेक मेला आहे...
द्वेष ही त्यांची
आता संस्कृती झाली आहे
त्यांच्या पतनाची आता
वेळ जवळ आली आहे....
किती आले किती गेले
इतिहास काही बदलला नाही
त्यांनी तर अटकेपार झेंडे नेले
ग्रेड वाल्यांनी तर अजुन
महाराष्ट्राही पार नाही केले..

Tuesday, August 24, 2010

आता आमदारांनाही...

खासदारांना तर झाली
आता आमदारांनाही हवी आहे
जनतेसाठी तर खासदार-आमदारांना पगारवाढ
ही गोष्टच नवी आहे...

सालगडी..

लोकशाही चे मालक ही आता
नोकरासारखी पगारवाढ मागु लागले
सालगडी, नोकरदार मात्र हे ऎकुण
एकमेकाच्या तोंडाकडे बघु लागले..

Sunday, August 22, 2010

जनतेची कैवारी

खासदारांना पगारवढ
झाली भरतीच भारी..
खरचं यांना म्हणावे का
जनतेची कैवारी.. ?

Saturday, August 21, 2010

खासदारांची पगारवढ

खासदारांना दिला पगारवाढीचा मलिदा
आता ते खातील तुपाशी,
गरीब शेतक-यांच्या देशात मात्र
शेतकरीच मरतील उपाशी.
त्यांना झाली आहे भरघोस पगारवाढ
तरी ते संसदेत झोपा काढणार
जनतेचे प्रश्न तसेच राहतील
तेच मात्र आणखी सवलती मागणार
मग त्यांच्यावर सवलतींचा पाऊस पडेल
कारण तेच आता पृथ्वीवरील इंद्र
जनता मात्र पहात राहील आभाळाकडे
आणी वेड्यासारखे शोधत राहील अमावस्येचा चंद्र..

Monday, August 16, 2010

झी मराठी लिट्ल चॅम्प च्या ऑडीशनचा सुखद अनुभव...

प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या झी मराठी वरील लिट्ल चॅम्पस आयडीया सारेगम मुळे मुग्धा, कार्तीकी, आर्या, रोहीत, प्रथमेश ही नांवे रसिकांच्या ओठावर रेंगाळू लागली आहेत, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या लिट्ल चॅम्पस आयडीया सारेगम मुळे मुलांमध्ये संगीताविषयी मोठ्या प्रमाणात आवड निर्माण झालेली आहे. मुले नविन  लिट्ल चॅम्पस सारेगम परत केव्हा सुरु होणार याची आतुरतेने वाट पहात असतानाच झी मराठी ने ऑडीशनच्या तारखा जाहीर केल्या. माझी मुलगी सुध्दा याची आतुरतेने वाट पहात होती, ऑडीशनच्या जाहीराती सुरु झाल्या, ऑडीशन होणा-या केन्द्रांच्या नावांची माहीती मिळाल्यानंतर माझ्या मुलीला (आर्या) घेवुन ऑडीशनसाठी औरंगाबाद किंवा सोलापुर केंन्द्रावर जायचे आम्ही निश्चीत केले. ३ मे २०१० रोजी सोलापुर येथे ऑडीशनसाठी आम्ही गेलो. तेथे नोंदणी केल्यानंतर तिला क्रमांक २४३ मिळाला. आम्ही तिला ऑडीशनसाठी बोलावण्याची वाट पाहु लागलो. दोन तास जादुचे प्रयोग पाहील्यानंतर आर्याला ऑडीशनसाठी बोलावण्यात आले. ती आतमध्ये गेल्यानंतर आम्ही ती गाणे व्यवस्थीत म्हणेल का ? तिची निवड होइल का ? या विचारात असतानाच आर्या आली , मला तीच्या डोळे पाणावलेले दिसले, मी समजलो निवड झालेली दिसत नाही, तिची तयारी उत्तम झालेली होती तरीही निवड न झाल्यामुळे आमचेही मन थोडे नाराज झाले. तिला याबाबत विचारले असता , ती म्हणाली मला फक्त एका गाण्याचा मुखडा गायला लावला आणि जायला सांगितले, आम्ही तिची समजुत काढली, पुढील वेळेस परत प्रयत्न करु असे सांगुन पहीले पण ती ऎकेना, मी सर्वांची ऑडीशन संपल्यावर त्यांना भेटून याबद्दल विचारणार असा हट्ट तिने धरला. काही वेळातच ऑडीशन संपली, आर्या तिच्या आई सोबत सरळ ऑडीशन स्थळी गेली आणि तेथे तिची बासरीवादक श्री अमर ओक यांची भेट झाली त्यांनी काय काम आहे असे विचारताच तिने ऑडीशन बद्दल सांगीतले, त्यांनी तिला न कटवता एका तबला वादकाला सोबत बसवुन स्वत: संवादिका घेवुन तिची ऑडीशन परत घ्यायला सुरु केली, अमर ओक यांनी तिची एकुण १० वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऎकली, साधारणपणे दिड तास ही ऑडीशन चालली त्यांनी तिला गाताना तिच्या होणा-या चुकांबद्दल सविस्तरपणे सांगीतले, तुझा आवाज चांगला आहे परंतु तुला आणखी तयारीची गरज आहे असे सांगीतले, तिचे समाधान झाल्यानंतरच त्यांनी तिला निरोप दिला. अमर ओक यांना असे करण्याची काहीच आवशकता नव्हती, एकदा ऑडीशन झाल्यानंतर परत ऑडीशन घेण्याचीही गरज नसते, कोणी तशी विनंती केली तरी त्यांना पुढील ऑडीशनला येण्याचा सल्ला दिला जातो, परंतु अमर ओक यांच मोठेपण की त्यांनी माझ्या मुलीसाठी वेळ दिला, तसे पाहीले तर अमर ओक हे टी.व्ही.वरील लोकप्रीय बासरीवादक, महाराष्ट्रात ह्जारो मुलांचे ऑडीशन होणार, कोण्या एका मुलीसाठी परत ऑडीशन घेण्याची त्यांना काहीच गरज नव्ह्ती, त्यांना आम्हाला परत पाठवणे अवघड नव्हते, परंतु त्यांनी तसे केले नाही यातच त्यांचे मोठेपण, यामुळे तिचे नैराष्य मात्र दुर झाले, आता झी मराठी वर अमर ओक (बासरीवादक),निलेश परब (तबला वादक) दिसले की आम्हाला त्या प्रसंगाची आठवण होईल, हा सुखद अनुभव नेहमीसाठी स्मरणात राहील...         

Saturday, August 14, 2010

स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व मराठी ब्लॉगर्सना, मराठी प्रेमींना स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. लाखमोलाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्यविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्र्यविरांना मानाचा मुजरा..स्वातंत्रदिन चिरायु होवो

Thursday, August 12, 2010

रायगड दर्शन व नंतरचा थरार...एक अनुभव.

मी माझा एक मित्र दोघांच्या कुटूंबासह रायगड दर्शनासाठी गेलो. गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सह्याद्रीच्या उंचच उंच कड्यावर रायगडाचे एक टोक नजरेस पडले. रायगडावर मुख्य परंतु आम्ही रोप वे मध्ये बसुन रायगडावर पाऊल ठेवले. महाराष्ट्रातील एकुण ६५० गड्कोट किल्ल्यांपॆकी सर्वात दुर्गम आणि गौरवपुर्ण किल्ला म्हणजे रायगड. हा किल्ला शके ७०५ इ.स.७८३ मध्ये राष्ट्रकुटच्या काळात बांधला गेला. महाड पासुन २४ कि.मी. अंतरावर काळ आणि  गांधारी या नद्यांच्या विळख्यात हा अजस्त्र किल्ला दिमाखात उभा आहे. सह्याद्रीच्या कुशीतील हा अभेद्य व बळकट किल्ला छ.शिवाजी महाराजांची वॆभवशाली राजधानी म्हणून मानाने मिरवला. रायगडाला एकुण १४ नावे असल्याची माहीती मिळते. १) रायरी,२) रायगीरी, ३) जंबूव्दीप ,४) राजगीरी, ५) तणस, ६) राशिवटा, ७) इस्लामगड ,८) रायगड , ९) नंदादीप ,१०) बंदेनुर ,११) भिवेगड, १२) रेड्डी १३) राहीर १४) पुर्वेकडील जिब्राल्टर. (इंग्रजांनी ठेवलेले नांव) रायगड ही स्वराज्याची राजधानी असल्यामुळे तेथे १२ महाल आणि १८ कारखाने असे ३० विभाग होते. त्यमुळे प्रशासन व्यवस्थीत चाले. छ.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथेच झाला, त्यांचे सिहांसन बालेकिल्ल्याच्या मध्यभागी होते, हे सिहांसन ३२ मन सोने, हिरे, नवरत्ने जड्वलेले होते अशी माहीती मिळाली. रायगडाला एकुन ५ दरवाजे होते मुख्य दरवाजा म्हणजे चित दरवाजा, नाना दरवाजा, मशिदमोर्चा, महादरवाजा, चोरदरवाजा. रायगडाच्या चढ्णीची सुरवात चित दरवाजातुन होते.     
 छ.शिवाजी महाराजांची वॆभवशाली राजधानी पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात आपलं मन नकळत शिवरायांच्या काळात रायगड कसा असेल या विचारात रमुन जातं आणि मग शिवरायांचा गॊरवशाली इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. रायगडावर दरबाराचे प्रवेशद्वार होळीचा माळ, टकमक टोक, बाजारपेठ, ब्राम्हणवाडा, राणीमहाल,सरदारवाडा, जगदिश्वराचे मंदीर व  जगदिश्वराच्या मंदीरसमोर रायगडावरील पृथ्वीमोलाचे लेणे राजे श्री शिवछत्रपतींची समाधी आहे. मुळ्च्या अष्टकोनी चॊथ-यावर श्री शिवाजी रायगड स्मारक समितीने ही घुमटी बांधलेली आहे. आत महाराजांचा अर्धाकॄती पुतळा आहे. रायगडावरील सर्व बांधकाम श्री हिरोजी इंदुळकर यांनी पुर्ण केले, बांधकामाची बिदागी जेव्हा राजेंनी देवु केली त्यावेळी मला काहीही नको फक्त माझे नांव प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी कोरण्यात यावे अशी मागणी इंदुळकरांनी केली ’सेवेशी तत्पर हिरोजी इंदुळकर " असा शिलालेख आजही तेथे पहायला मिळतो. 
    रायगड दर्शनासाठी एक-दोन दिवस पुरत नाहीत एवढा रायगड विस्ताराने मोठा आहे. रायगड पाहुन परत निघेपर्यंत संध्याकाळ झाली होती, रायगडवरुन पाय निघत नव्हता परंतु परत येणं आवश्यक असल्यामुळे आम्ही रोप वे च्या मार्गाने परत फिरलो. रायगड सोडुन निघाल्यानंतर महड मार्गे पुण्याकडे आमचे मार्गक्रमण चालु झाले. संध्याकाळ टळुन गेली होती त्यामुळे एका वाटसरुला पुण्याकडे जाण्याचा मार्ग विचारला ,त्याने सांगितलेल्या रस्त्याने आम्ही निघालो साधारणपणे रात्रीचे ८ वाजले असतील आम्ही वरंध घाटात प्रवेश केला, त्यानंतर आमच्या थरारक प्रवासाला सुरुवात झाली. निर्मनूष्य वरंध घाटात अवघड वळणे, रस्त्याच्या दुतर्फा दाट जंगल, रातकिड्यांचा किर्र.. आवाज आणि ह्र्दयाचा थरकाप उडवणारा काळोख यातुन आमचा प्रवास सुरु झाला. घाटामध्ये एकही वाहन, माणूस, घर, होटेल, आमच्या नजरेस पडत नव्हते त्यामुळे कुटूंबीयांसह आम्हीही मनातुन घाबरलेलो होतो. यापुर्वीही आम्ही रात्रीच्या वेळी बराच प्रवास केलेला होता परंतु वरंध घाटातील अनूभव खुपच घाबरवून टाकणारा होता. प्रत्येक वळ्ण संपल्यानंतर वाटायचे आता तरी सरळ रस्ता सुरू होइल व घाट संपेल, पण घाट संपायचे नांव नव्हते, प्रत्येक येणारे वळण सारखेच वाटायचे,  ह्ळूह्ळू वाटायला लागले की आपण रस्ता चुकलो आहोत, ते पाहण्यासाठी थांबण्याची हिंमत होत नव्हती  आणि त्यात रस्ता निर्मनूष्य त्यामुळे कोणाला विचारणेही शक्य नव्हते, ह्ळूह्ळु आम्ही देवाचा धावा सुरु केला, मध्येच आम्हाला मशालीसारखा एक प्रकाश दिसला , आम्हाला आमच्या पाठलागावर कोणीतरी असल्याचा भास होवु लागला, आम्हा सर्वांची भितीने गाळण उडाली, वाटायला लागले आता या घाटात आपली गाडी कोणी आडवली तर काय करायचे ?  तब्बल एक ते दिड तास आम्ही त्या भितीच्या छायेखाली प्रवास करीत होतो, त्यानंतर तो प्रकाश दिसेनासा झाला, पुढे  तब्ब्ल साडेचार तासाच्या मनाला गोठवून टाकणा-या वरंध घाटातील त्या जीवघेण्या प्रवासानंतर आम्हाला सरळ रस्ता दिसायला लागला, मग काही वेळातच भोर गांव लागले, आम्ही सुटकेचा श्वास घेतला. भोरला रात्री साडेबारा वाजता बसस्थानकाजवळ एक आजोबा भेटले त्यांना आम्ही पुण्याकडे जाण्याचा मार्ग विचारला त्यांनी कोठून आलात असा प्रश्न विचारला आम्ही रायगडावरुन निघुन वरंध घाटातुन आल्याचे सांगीतले त्यावर ते म्हणाले रात्रीच्या वेळी वरंध घाटातुन  कोणीच प्रवास करत नाही खुप धोकादायक आहे, तुमचे नशीब चांगले म्हणुन तुम्ही सुखरुप आलात, त्या घाटात यापुर्वी गाडी अडवुन मारहाणीच्या व गाडी घाटाखाली ढ्कलुन दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे ऎकल्यावर आम्ही गार झालो. शेवटी देवाचे आभार मानत आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली..
अमोल देशमुख,    
http://aapplimarathi/blogspot.com