Friday, January 14, 2011

पानिपत च्या शौर्यगाथेला २५० वर्षे पुर्ण झाली....

(पानिपत रणसंग्रामातील विर योध्द्यांना मानाचा मुजरा...........)

इ.स.१७६१ साली झालेल्या पानिपतच्या युध्दाला १४ जानेवारी २०११ रोजी २५० वर्षे पुर्ण होत आहेत. पानिपतचे युध्द हे मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्चाचे पान आहे. पानिपतच्या युध्दात पराभव जरी पत्कारावा असला तरी ती मराठ्यांच्या इतिहासातील एक शौर्यगाथा होती. ती लढाई जिंकली असती तर
त्यावेळी मराठी सत्ता महासत्ता म्हणुन उदयास आली असती.

पानिपत लढाईमध्ये सहभागी हजारो मराठी सरदारांना आपले प्राण गमवावे लागले. पराभव परंतु प्रेरक अशी ही जगाच्या इतिहासातील दुर्मीळ घटना आहे.

पानिपतच्या युध्दात हार पत्करुन सुध्दा मराठ्यांनी अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातुन धडा घेवुन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक्रमक त्यानंतर भारतावर हल्ला करु शकला नाही हा त्या लढाईतील पराक्रमाचा इतिहास आहे.

१४ जानेवारी २०११ रोजी पानिपत रणसंग्रामास २५० वर्षे पुर्ण झाली पानिपतच्या रणांगणात धारातिर्थी पडलेल्या विरांचे रक्त आणि २६/११ च्या पाकीस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिका-यांचे रक्त हे शुर विरांनी आपल्या देशाला सुरक्षीत ठेवण्यासाठी सांडलेले रक्त होते. त्यांनी देशरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, आज आपण त्यांच्या या बलीदानाची जाणीव ठेवुन आपण आपल्या देशासाठी काय करु शकतो याचा विचार करुन तो विचार आमलात आणला पाहीजे तर त्या सर्व विरांना खरी श्रध्दांजली ठरेल........

पानिपत लढाईमध्ये शहीद झालेल्या हजारो विरांना मानाचा मुजरा......

1 comment:

  1. खरोखरच पानीपत चे नव जरी काढले तरी अंगावर कटा येतो - विशाल रणदिवे (पुणे)

    ReplyDelete