Wednesday, October 6, 2010

पाकीस्तानी कलाकार बीग बॉसच काय कुठेच नकोत...

फक्त भारतव्देष हीच ज्यांची संस्कृती आहे त्यां पाकीस्तानी कलाकारांना भारतामध्ये  बोलवतात कशाला हा प्रश्न सध्या तमाम भारतीयांना पडलेला आहे. पाकीस्तानी कलाकारांना भारतात बोलावुन काही वाहीन्या देशविरोधी कारवाया करण्यात धन्यता का मानतात, त्यांना जाब विचारनारा या देशात कोणीच नाही का, संपर्ण भारतामध्ये भारतातील कोणत्याच कार्यक्रमामध्ये पाकीस्तानी कलाकारांना  सामील करुन घेवु नये या मताचा मी आणि समस्त देशप्रेमी मंडळी आहेत , बर ही पाकीस्तानी कलाकार मंडळी पाकीस्तानचा भारतव्देष संपवण्याचा कधीही प्रयत्न करताना दिसुन येत नाहीत. भारताविरुध्द कायम अतिरेकी कारवाया करणा-या, भारतात अशांतता माजवणा-या पाकीस्तानी नेत्यांची कानउघडनी करताना दिसत नाहीत मग त्यांना बोलावुन या वाहीन्या फक्त टीआरपी वाढवण्यासाठीच हा उपद्व्याप करतात असे समजायचे का. पाकीस्तानी कलाकारांना भारतामध्ये येवू न देण्याचा पवित्रा काही राजकीय पक्ष घेतात मात्र त्यांना सरकारकडून वा मतांच्या लाचारीसाठी लांगुलचालन करणारे राजकीय पक्ष विरोध करतात, उलट अशा पाकीस्तानी कलाकारांना खेळाडुंना संरक्षण पुरविण्यात ही मंडळी धन्यता मानतात आणि खेळामध्ये, कलेमध्ये राजकारण आणू नये असा दांभीकपणाही मिरवतात. पाकीस्तानी कलाकारांच्या विरोधात आंदोलन करणा-या पक्ष, संघटनेच्या कार्यकर्त्यांवर खटले भरतात. हे सर्व भारतातील जनता मात्र निमुटपणे, त्रयस्थपणे पहात राहते.
जनतेने हे सारे त्रयस्थासारखे न पाहता याला आपल्यापरीने विरोध केला पाहीजे, अशा वाहींन्यांवर अशा कार्यक्रमांना पुरस्कृत करणा-या उत्पादनांवर बहीष्कार घातला पाहीजे , भारतविरोधी कारवाया करणा-या पाकीस्तानला, तेथील कलाकारांना, खेळाडुंना, राजकीय नेत्यांना भारतात प्रवेश नाकारलाच पाहीजे तरच "भारत माता की जय" सार्थ वाटेल.

1 comment:

  1. मित्रा,
    अगदी मनातल लिहिलास.धन्यवाद.

    ReplyDelete