Friday, November 12, 2010

भ्रष्ट्राचाराचा शाप

महाराष्ट्रात पृथ्वीराज आले
आता कॉग्रेसी नेत्यांना
कोणताच घोटाळा माफ नाही
कारण दिल्लीला माहीत आहे की
महाराष्ट्रात आदर्श घोटाळ्यात गुंतलेला
कोणताच हात तसा साफ नाही
प्रत्येक नेता कोणत्या ना कोणत्या
आरोपांनी घेरलेला
प्रत्येकाचाच खजीना
काळ्या पैशानेच भरलेला
महाराष्ट्राच्या राजकारणातील नेत्यांना
हा भ्रष्ट्राचाराचा शाप आहे
नेते तर नेतेही तसेच
भ्रष्ट्राचाराच्या बाबतीत
नोकरशहा तर त्यांचा बाप आहे.

No comments:

Post a Comment