Thursday, November 25, 2010

पाकड्यांनो आम्ही हिंमत हरलो नाहीत...

२६/११ आली 
स्रर्वांनाच आठवलं
पाकीस्तान ने दोन वर्षापुर्वी
अतीरेक्यांना भारतात पाठवलं
इथली निष्पाप माणसं मारायला
चौकाचौकात बॉंब फोडायला
पण शेवटी अतीरेक्यांनो
तुम्हीच हरलात
कारण तुम्ही बॉंब फोडले
अंदाधुंद गोळीबार केला
तरी आम्ही..
आमची जीगर हरलो नाहीत
आमची हिंमत हरलो नाहीत
आम्ही जगासमोर तुम्हाला उघडं केलं
तुम्ही मात्र उघड्या डोळ्यांनी
आमची हिंमत पहात राहीलात
आतल्या आत जळत राहीलात
आमच्या पासुन पळत राहीलात
तुमच्याशी लढताना
आमचे जवान शहीद झाले
पण जाता जाता आम्हाला
जगण्याची जिद्द देवुन गेले
पाकड्यांनो एक दिवस तरी तुम्हाला
दहशतवाद सोडावाच लागेल
आणि दिल्ली पासुन गल्ली पर्यंत
ऐकु जाइल एवढ्या जोरात
"जयहिंद" चा नारा द्यावाच लागेल... 

(२६/११ च्या पाकीस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या सुपुत्रांना भावपुर्ण श्रध्दांजली)
 

................अमोल देशमुख,माजलगांव(बीड)

No comments:

Post a Comment