Friday, September 10, 2010

जातीयवादाची ही विषारी फळे खरचं कोणी चाखायची....

आम्ही भारतीय
आम्ही महाराष्ट्रीयन
आम्ही या मातीचे
हे सारं मागे पडलं हो..
आता
आम्ही या जातीचे
आम्ही त्या जातीचे
जातीनिहाय....
आमचे नेते वेगळे
आमचे रंग वेगळे
आमचे झेंडे वेगळे
आम्ही त्यांचा द्वेष करणार
ते आमचा द्वेष करणार
आमच्या अंगणात फुलाचे झाड नाही पण
जातीची ही विषवल्ली मात्र
आम्ही सर्वांनीच जोपासली
त्याला नेत्यांनी व्यवस्थीत खतपाणी घातले
सरकारने आधार दिला
त्याची कडु फळे मात्र चाखावी लागतील
आमच्या येणा-या पिढीला
आम्ही त्यांना काय देतोय
सुरक्षीत भविष्य का
जातीची ही विषारी फळे..
खरच विचार करा

No comments:

Post a Comment