Tuesday, September 20, 2016

आमच्या संवेदना तशाच विरतील

उरी हल्ल्यातील आज आणखी एक जवान शहीद.,18 झाले
---------------------------------------
शहीद झाले सैनीक ऊरीत
सांडले त्यांचे रक्त
पावन झाली भारतमाता
आता उरल्या वेदना फक्त
कोण होते ते शहीद जवान
कोणता त्यांचा धर्म
जात कोणती त्यांची
कोणती त्यांचा वर्ण
कोणता त्यांचा प्रांत
कोणती त्यांची भाषा
ते फक्त भारतमातेचे पुत्र होते...
त्यांच्यासाठी..
आता कोणी काढेल का मोर्चा
कोणी काढेल का कॅडल मार्च
कोणी गाळेल का आश्रू
घडेल का मिडीयावर चर्चा
असं काहीच होणार नाही
*आज 18 मेले
उद्या 25 मरतील
आमच्या संवेदना तशाच विरतील
आमची सारी रुदनं आमच्या जातीसाठी
सत्ताधाऱ्यांची मतासाठी
मिडीयाची टी.आर.पी. साठी
*ते मात्र निरंतर शहीद होतात
फक्त भारतमातेसाठी.....*

अमोल देशमुख
20/09/2016                         

No comments:

Post a Comment